नरेंद्र मोदी जवानांच्या बलिदानाचे भांडवल करतात : अशोक गेहलोत

सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग यूपीएससी, सीएजी यासारख्या संवैधानिकसंस्था धोक्‍यात आलेल्या आहेत. -अशोक गेहलोत
ashok_gehalot.
ashok_gehalot.

मुंबई  : भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

गेहलोत म्हणाले की, कॉंग्रेसने 70 वर्षे देशात लोकशाही टिकवून ठेवली. देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः राष्ट्रवादाचा मुखवटा घालून विरोधी पक्षांना देशद्रोही ठरवत आहेत. नरेंद्र मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे तसेच शास्त्रज्ञाच्या कार्याचे स्वतःसाठी भांडवल करतात.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप सरकार त्यांच्या जाहीरनाम्यातील वचनांबद्दल, त्यांच्या योजनांबद्दल, ध्येय धोरणांबद्दल, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करणार या गंभीर मुद्द्यांवर काहीच बोलत नाही.

फक्त भावनिक मुद्द्यांवर बोलत आहेत. भाजप सरकार नेहमीच जुने भावनिक मुद्दे बाहेर काढून निवडणूक जिंकत आलेली आहे, असे उद्‌गार गेहलोत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काढले.

अशोक गेहलोत पुढे म्हणाले कि सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग यूपीएससी, सीएजी यासारख्या संवैधानिक  संस्था धोक्‍यात आलेल्या आहेत. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले कि, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढले. 

या पत्रकार परिषदेला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, उपाध्यक्ष आणि माजी आमदार चरण सिंग सप्रा, उपाध्यक्ष कुंवर सिंग राजपूत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com