हवा का झोका कभी आंधी नहीं होता,और चरखा चलाके कोई गांधी नहीं होता : अशोक चव्हाण

" हवा का झोका कभी आंधी नहीं होता,और चरखा चलाके कोई गांधी नहीं होता," अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले .
Ausa-Congress-melava.
Ausa-Congress-melava.

लातूर : " हवा का झोका कभी आंधी नहीं होता,और चरखा चलाके कोई गांधी नहीं होता,"  अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले .

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयोजित ' जनसंघर्ष यात्रा' लातूर जिल्ह्यातील  औसा येथे आज सकाळी आली . त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते . यावेळी शिवराज पाटील चाकूरकर , सुशीलकुमार शिंदे ,  पृथ्वीराज चव्हाण , हर्षवर्धन पाटील , बाळासाहेब थोरात , नसीम खान , बसवराज पाटील , अमित देशमुख  आदी काँग्रेसचे नेते या सभत सहभागी झालेले होते .

 यावेळी भाजप सरकारवर घणाघाती हल्ला चढवताना अशोक चव्हाण म्हणाले ,"  कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे भाजपा सरकारने जनतेला सांगावं.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परीषद घेऊन आपली व्यथा मांडतात म्हणजे काय अवस्था झाली आहे हे पाहावं.भाजपा सरकारच्या काळात 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आमच्या काळात सरसकट कर्जमाफी झाली. मात्र यांच्या काळात तारीख पे तारीख सुरू आहे. अजूनही कर्जमाफी लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. "

श्री चव्हाण पुढे म्हणाले ,"आता रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली  आहे कि खड्डयात रस्ते कि रस्त्यात खड्डे कळत नाही.चंद्रकांत दादांनी एवढा पैसा खड्ड्यांसाठी खर्च केला तर पैसा गेला तरी कुठे? पंतप्रधानांनी किमान साईबाबाच्या चरणी तरी खोट बोलू नये. अडीच ते तीन कोटी घरे आम्ही बांधले मात्र पंतप्रधान खोट बोलतं आहेत . "

माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले ," आडवणींनी रथयात्रा काढली. दोन सरकार भाजपाची आली मात्र तरीही राम मंदीर बांधले नाही.आता भाजपा घरी जात असताना राम मंदीरचा कायदा करा असं म्हणतं आहे.एवढी वर्षे सत्ता असताना काय केलं? काँग्रेस पक्ष राम मंदीरचा कायदा मुळीच करणार नाही.  मोदींना शिर्डीत पुडी सोडली कि मी सोलापूरातील जँकेट वापरतो.आम्ही सर्व सोलापूर पिंजून काढलं मात्र आम्हांला कोणीही भेटलं नाही. आम्ही रस्ते बांधायचे काम केले आणि मोदींनी उद्घाटन केली म्हणे आम्ही केले. ते फक्त पुडी सोडायचं काम करतात." 

माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ," परतीचा पाऊस देखील संपलेला आहे.अजून पाऊस सुरू होण्यास 8 महिने  लागणार आहे. अत्यंत भीषण अशी परीस्थिती आहे,मात्र सरकार दुष्काळ संदर्भात गंभीर नाही. पेट्रोल डिझेलवर लावणाऱ्या वँट टँक्समधून सरकारने 21 लाख कोटी खिशात टाकले आहे.  सरकारजवळ पैसा नाही.म्हणून पेट्रोल डिझेलवर कर लावले जात आहेत. 2019 मध्ये जर मोदी सत्तेवर आले तर हुकुमशाही फक्त सुरू होईल. " 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com