कल्याण-डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी कधी देता ? : अशोक चव्हाण 

Ashok_chavhan_devendra_
Ashok_chavhan_devendra_

मुंबई : विकासाच्या खोट्या वल्गना करण्याआधी कल्याण डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी रुपये कधी देणार? ते सांगा, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे . 

भाजपवर तोफ डागताना अशोक चव्हाण म्हणाले ," शिर्डीमध्ये साईबाबांच्या समोर येऊन देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलले होते. तीच परंपरा कल्याण येथे देखील धादांत खोटे बोलून पंतप्रधानांनी सुरू ठेवली आहे. गेले चार वर्ष जुमलेबाजी व अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना करणे ह्यापेक्षा अधिक मोदी तसेच राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केलेले नाही."

 " धादांत खोटं बोलून अवास्तव घोषणांचा पाऊस पाडायचा ही कार्यपद्धती पंतप्रधानांनी कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ही सुरू ठेवली आहे. निवडणूका केवळ काही महिनेच दूर असल्याने या जुमलेबाजीचा अंत जवळ आला असून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने भाजपच्या जुमलेबाजीचा जसा अंत केला तसाच अंत महाराष्ट्राची जनता करेल," असा विश्वास खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com