महाराष्ट्राचेही उद्या त्रिभाजन करतील - अशोक चव्हाण

 महाराष्ट्राचेही उद्या त्रिभाजन करतील - अशोक चव्हाण

औंरगाबाद : केंद्र सरकारने ज्या पध्दतीने कुणालाही विश्‍वासात न घेता काश्‍मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. ते देशातील लोकशाहीला मारक आहे. उद्या अशाच पध्दतीने सरकार अनेक राज्ये बरखास्त करतील, कदाचित महाराष्ट्राचे देखील त्रिभाजन होईल अशा शब्दांत कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. 

औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना अशोक चव्हाण यांनी काश्‍मिरातील कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सडकून टिका केली. हा विषय जरी केंद्राशी संबंधित असला तरी ज्या पध्दतीने हा निर्णय घेण्यात आला तो लोकशाहीला पायदळी तुडवणारा आहे. देशात चुकीची प्रथा हे सरकार पाडू पाहत आहे. सरकार अशाच पध्दतीने वागत राहिले तर उद्या अनेक राज्य बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. उद्या कदाचित महाराष्ट्राचेही त्रिभाजन होईल अशी भिती चव्हाण यांनी व्यक्त केली. 

जम्मू-कश्‍मीरचा विषय हा हिंदू-मुस्लिमचा नाही, पण केंद्र सरकारच्या निर्णयाने देशाच्या एकसंघ संकल्पनेलाच छेद देण्याचा प्रयत्न झाला असल्याची टिकाही अशोक चव्हाण यांनी यावेळी केली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com