१४५ आमदार तरी उपस्थित होते का ?  आशिष शेलार

..
_Ashish_Shelar_
_Ashish_Shelar_

पुणे -"महाविकास आघाडीने १६२ आमदार एकत्र आणले असा दावा केला आहे मात्र १४५ आमदार तरी उपस्थित होते का ?" असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

आज शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या १६२ आमदारांना एकत्र बोलावले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या या बैठकीनंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन आघाडीवर टीका केली.

आशिष शेलार म्हणाले ,"आज महाविकास आघाडीने आमदारांची ओळख परेड घेतली. पण ओळख परेडने बहुमत सिद्ध करता येत नाही. आज १६२ आमदार उपस्थित होते असा दावा त्यांनी केला आहे पण प्रत्यक्ष १४५ आमदार तरी उपस्थित होते का ?"असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.


"शिवसेनेने लोकशाहीची थट्टा सुरु केली आहे. जनमताचा अनादर केला आहे. आमदारांना एकत्र ठेवणे,त्यांच्यावर दबाब आणणे हे लोकशाहीच्या विरोधी कृत्य आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध करेल ." असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com