बजेट म्हणजे शिळ्या कढीला ऊत  : आशिष देशमुख

आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला सरकारने दुर्लक्षित केले आहे.
Ashish-Deshmukh.
Ashish-Deshmukh.

नागपूर:  केंद्रीय अर्थसंकल्प हा जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. उद्योगधंदे, बेरोजगारी व शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या गेल्या नाहीत. जुन्या योजनांमध्ये काही फेरबदल करून या सरकारने जुन्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

 ते पुढे म्हणाले ,उद्योगधंद्यांमध्ये नव्याने गुंतवणूक होत नसून मागील वर्षात दीड कोटी लोकांच्या हातचा रोजगार गेलेला आहे. रोजगार निर्मितीसाठी व असलेला रोजगार टिकवून ठेवण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. युवक-युवतींना रोजगारासाठी भटकंती करावी लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत देशात मागील वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण आहे. 

बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अंकुश बसेल, बंद असलेल्या किंवा मृतावस्थेत असलेल्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यासाठी उपाययोजना, उद्योगांमध्ये नवीन गुंतवणूक, युवकांचे नोकरीसाठी दुसऱ्या प्रांतात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी योजना इत्यादी बाबींसंबंधी काही महत्वाचे निर्णय घेण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे.

आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला सरकारने दुर्लक्षित केले आहे. जुन्याच योजनांचे आर्थिक आकडे बदलून त्यांना नवीन स्वरूप देण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा अर्थसंकल्प आहे, असेही डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com