आशिष देशमुखांची टोलेबाजी; भाजप-शिवसेनेतील राजकीय सौदेबाजीमुळे `नाणार' रद्द 

भाजपने शिवसेनेशी केलेल्या राजकीय सौदेबाजीतून नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे.
आशिष देशमुखांची टोलेबाजी; भाजप-शिवसेनेतील राजकीय सौदेबाजीमुळे `नाणार' रद्द 

नागपूर : भाजपने शिवसेनेशी केलेल्या राजकीय सौदेबाजीतून नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे. 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करून या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमीनी मूळ शेतमालकांना परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प होईलच, अशी घोषणा केली होती. आता या घोषणेचे काय झाले? असा सवाल करून आशीष देशमुख म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा नाणार प्रकल्प रद्द केला आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. केवळ निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी ही राजकीय सौदेबाजी असल्याचे आता उघड झाल्याचा आरोप आशीष देशमुख यांनी केला आहे.
 
नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार होता. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा निर्माण होणार होता. परंतु केवळ राजकीय फायदा पाहून व निवडणुकीतील विजयासाठी भाजपने महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोकणात नाणार होणार नसेल तर तो विदर्भात करावा, अशी अशी सूचना आपण केली होती. या सूचनेकडेही राज्य सरकारने लक्ष दिले नाही. या प्रस्तावाला भाजपमधील नेत्यांनी विरोध केला. यामुळेही विदर्भावर एकप्रकारने अन्यायच झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com