भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही पात्र नाही : केजरीवाल

गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरून ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील असेही केजरीवाल म्हणाले.
 भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही पात्र नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर टीका केली. आप आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले. 

दिल्लीत 70 जागांसाठी येत्या शनिवारी (ता. 8) मतदान होत असून 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही, हे समजेल.

ते म्हणाले, "आप' च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहीनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरून ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील असेही केजरीवाल म्हणाले. 

मग कॉंग्रेसला मत का दिले नाही 
मुलाखतीत केजरीवाल यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शीला दिक्षित सरकारच्या कामाचे श्रेय केजरीवाल घेत असल्याचा आरोप केला होता. याचा संदर्भ घेत केजरीवाल म्हणाले, की देशातील जुन्या पक्षाने दिल्लीतील लोकांसाठी काम केले असते तर त्यांनी कॉंग्रेस पक्षाला मतदान केले असते. त्यांना मत का दिले नाही, मतदारांनी आम आदमी पक्षाला मतदान का केले? असा सवाल केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com