कृत्रिम पाऊस केंद्राच्या परवानगीत अडकला

मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळीराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळीराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने नुकताच केंद्राला पाठविला आहे. मात्र, विविध विभागांच्या परवानगीसाठी दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कृत्रिम पाऊस केंद्राच्या परवानगीत अडकला

सोलापूर : मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळीराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळीराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने नुकताच केंद्राला पाठविला आहे. मात्र, विविध विभागांच्या परवानगीसाठी दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई विमानतळ येथे भारतीय हवामान खात्याचे तर सोलापुरात केंद्र सरकारच्या आयआयटीएम संस्थेचे रडार कृत्रिम पावसाकरिता सज्ज आहे. आता नव्याने औरंगाबाद विमानतळावरही रडार बसविण्यात येणार आहे. रडारच्या माध्यमातून ढगांचा वेध घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल, असेही मदत व पुनर्वसन विभागाने सांगितले. मात्र, कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यापूर्वी प्लानिंग कमिशन, गृहमंत्रालय, नागरी हवाई उडाण, विदेश मंत्रालय, कस्टम ऑफीस या विभागांच्या परवानगीची आवश्‍यकता आहे. 

दरम्यान, वायरलेस व रेडीओ लहरींचा वेध घेण्यासाठी हवामान विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. या विभागांच्या परवानगीशिवाय कृत्रिम पावसाचा प्रयोग अशक्‍य असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी...
- सोलापूर, औरंगाबाद अन्‌ मुंबईतून रडारद्वारे पडणार कृत्रिम पाऊस
- रेडीओ लहरींद्वारे ढगांचा वेध घेऊन कृत्रिम पावसासाठी विमाने सज्ज
- राज्यातील विविध भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 32 कोटींचा खर्च
- केंद्रातील विविध विभागांच्या परवानगीसाठी मदत व पुनवर्सन विभागाचा प्रस्ताव
- 45 दिवसानंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला होणार सुरुवात

राज्यात मान्सूनने पहिल्याच टप्प्यात हुलकावणी दिल्याने सोलापूर, औरंगाबाद व मुंबईतून रडारद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला आहे. परवानगी लवकर मिळाल्यास तत्काळ कार्यवाही सुरु होईल.
- श्रीरंग घोलप, अव्वर सचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com