अंकिता हर्षवर्धन पाटील म्हणतात यामागे मोठे षडयंत्र : त्यांचा ठपका कोणावर?

अंकिता हर्षवर्धन पाटील म्हणतात यामागे मोठे षडयंत्र : त्यांचा ठपका कोणावर?

पुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्याविरोधात षडयंत्र तर रचले जात नाही ना, असा संशय खुद्द अंकिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य पदावरून अंकिता पाटील यांची काॅंग्रेसमध्ये कोंडी करण्यात आली. त्यांच्याऐवजी हे पद दत्ता झुरुंगे यांना देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्य़क्ष संजय जगताप यांनी आग्रह धरला. त्यावरून वाद झाला. अंकिता पाटील यांनी माघार घेतली. त्यानंतर झुरुंगे यांनीही माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर संधी मिळावी आणि विषय समितीच्या सदस्यपदाची बिनविरोध निवडीची परंपरा खंडित होऊ नये, असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च विषय समिती असलेल्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणुकीतून जाणिवपूर्वक माघार घेतली. त्यामुळे शेतकरी पुत्र असलेले दत्तात्रेय झुरंगे आपोआप बिनविरोध निवडून आले असते. परंतु माझ्या उमेदवारी अर्ज माघारीनंतर झुरंगे यांनीही माघार घेतली. त्यांना बिनविरोध निवडीची संधी चालून आली असतानाही त्यांनी का माघार घेतली, असा सवाल अंकिता  पाटील यांनी केला आहे.

यामागे नक्कीच काही तरी षढयंत्र असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.   स्थायी समिती सदस्यपदाची केवळ एकच जागा रिक्त आहे. मात्र या जागेच्या निवडीवरून सलग दोन सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तरीही ही न भरता ती तसीच रिक्त राहिली.

या पदाची निवड बिनविरोध होण्याची अपेक्षा आपल्या सर्वांसह मलादेखील होती. माझ्या राजकारणाची ही एक नवीन सुरुवात होती. म्हणून मला बाकींच्यासारखं राजकारण करण्याची गरज नाही. मी स्वर्गीय आदरणीय शंकररावजी पाटील  (बाबा), स्वर्गीय रत्नप्रभादेवी पाटील  ( आजी)  व ज्येष्ठ नेते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दाखवलेल्या मार्गाने समाजकारण करण्यास इच्छुक आहे.  संपूर्ण सभागृहातील संपूर्ण सदस्यांचा विशेषत: सर्व महिला सदस्यांचा मला पाठिंबा होता तरीदेखील जिल्हा परिषदेच्या इतिहासात कधीच न झालेल्या समित्यांच्या निवडणुका घेऊन मला जिल्हा परिषदेच्या  इतिहासाचे खंडन करायचे नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीची जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड व्हावी, ह्या अनुषंगाने मी माघार घेतली. माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दत्ता झुरंगे  यांनीही आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. पण झुरंगे यांनी संधी मिळत असतानाही आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला? मला ठाऊक आहे की ह्या गोष्टीमागे मोठे राजकीय षड्यंत्र आहे. पण मला त्यात पडायचं नाही.मला आपल्या सर्वांसाठी सर्व जनतेसाठी समाजकारण व लोकहिताचे राजकारण करायचे आहे, असा दावा त्यांनी यात केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com