अमरावती ः अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने पुन्हा झेंडा रोवण्यात यश मिळविले. अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण बिनविरोध निवडून आले. भाजपने संख्याबळाअभावी या निवडणुकीत आपला उमेदवारच रिंगणात उतरविला नाही.
सोमवारी (ता. सहा) जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत तसेच नायब तहसीलदार प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया राबण्यात आली. दुपारी 1 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी केवळ बबलू देशमुख तसेच उपाध्यक्षपदासाठी सेनेचे विठ्ठल चव्हाण यांचेच अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
विशेष म्हणजे, अध्यक्षपदी निवड झालेले बबलू देशमुख हे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचेसुद्धा अध्यक्ष आहेत. त्यांनी अचलपूर मतदारसंघातून विद्यमान राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात निवडणूक लढविली, मात्र त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीचे संख्याबळ थेट 38 पर्यंत पोहोचल्याने भाजपने या निवडणुकीला सामोरे न जाणेच पसंत केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.