नगर : " विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसंदर्भातील निर्णयांची घोषणा मुंबईतून होत असते. भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर आला, तर तुम्हाला घेऊन, नाही तर सोडून निवडणूक लढविण्याची शिवसेनेची तयारी कायम असते,'' असा टोला शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचा नामोल्लेख टाळून लगावला.
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त नुकतेच नगरमध्ये येऊन गेले. त्यांनी महाजनादेश यात्रेचा रथ थांबवून मला बोलावून घेतले. याचा अर्थ त्यांना माहीत आहे, शहरात कोणाचे वजन जास्त आहे ते..!'' असा टोलाही राठोड यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, दत्ता कावरे, श्याम नळकांडे, अशोक दहिफळे उपस्थित होते. राठोड म्हणाले, " लोकशाहीचे राज्य आहे. प्रत्येकाला पक्षाचे तिकीट मागण्याचा अधिकार आहे. भाजप, राष्ट्रवादीमध्ये या संदर्भात कायमच कुरघोडी होते. मात्र, शिवसेनेत समन्वय आहे. पालकमंत्री राम शिंदे म्हणतात, युतीत काही जागेवर फेरविचार होणार आहे. परंतु तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. या संदर्भात मुंबईतूनच निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.