Chetan Zadpe
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं १९८४ मध्ये निधन झाल्यावर, राजीव गांधी पंतप्रधान बनले. आपल्या कार्यकाळात त्यांनी बरेचसे निर्णय घेतले. यात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे १८ वर्षाचा तरूणांना मतदानाचा अधिकार!
मतदानाचं वय २१ वरून १८ वर्ष करण्याच्या विधेयकाला २० डिसेंबर १९८८ ला मंजूरी देण्यात आली होती.
मतदार नोंदणीसाठी पहिल्यांदा वय २१ वर्षे होते. संविधानाच्या ६१ व्या दुरुस्ती कायद्यामध्ये दुरूस्ती करून ती १८ वर्षावर आणण्यात आली.
मतदार नोंदणीसाठी किमान वय १८ वर्षे करण्यात आले. डिसेंबर १९८८ मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजच्याच दिवशी म्हणजे २८ मार्च १९८९ पासून करण्यात आली.
या क्रांतीकारी निर्णयामुळे देशाच्या धोरण प्रक्रियेत तरूणांचा सहभाग वाढला.
मतदानाचं वय २१ वरून १८ वर्ष केल्यामुळे तत्कालीन वर्षी म्हणजे १९८८ मध्ये ५ कोटी मतदारांची आणखी भर वाढली.
या निर्णयाला मोठा विरोध पण झाला. पण राजीव गांधी यांना विश्वास होता की, राष्ट्र निर्मितीसाठी तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.