सरकारनामा ब्यूरो
राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलणार असून, केंद्र सरकारची 'पीएमश्री' योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया' महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरु करण्यात येणार आहे.
काय आहे 'पीएमश्री' योजना?
शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपायोजना सुचवल्या जातील.