Vijay Diwas 2022 : पाकिस्तानवर विजय मिळवत भारताने जगाचा नकाशाच बदलला...

अनुराधा धावडे

पाकिस्तानवर भारताच्या विजयानिमित्त, 16 डिसेंबर हा दिवस देशभरात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

Vijay Diwas 2022

या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि पाकिस्तानने आपल्या 93 हजार सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर शरणगती पत्करली.

Vijay Diwas 2022

1971 च्या युद्धात सुमारे 3,900 भारतीय जवान शहीद झाले होते आणि सुमारे 9,851 जखमी झाले होते.

Vijay Diwas 2022

03 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. जे तब्बल 13 दिवस चालले.

Vijay Diwas 2022

यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्यरात्री देशाला संबोधित करताना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची माहिती देत ​​युद्धाची घोषणाही केली होती.

Vijay Diwas 2022

या युद्धावेळी फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ हे भारतीय लष्कर प्रमुख होते.

Vijay Diwas 2022

माणेकशॉ नेतृत्वाखालीच भारताने हे युद्ध लढले आणि ऐतिहासिक विजय मिळवला.

Vijay Diwas 2022

धर्माच्या आधारे भारतापासून वेगळे झालेल्या पश्चिम पाकिस्तानने तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर पाशवी अत्याचार केले.

Vijay Diwas 2022

पुर्व पाकिस्तानला या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी भारत या युद्धात सामील झाला आणि आजच्याच दिवशी पाकिस्तानातून बाग्लांदेश विभक्त झाला.

Vijay Diwas 2022

इतकेच नाही तर भारतीय लष्कराच्या शौर्यामुळे 16 डिसेंबर 1971 रोजी जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या रूपाने एका नव्या देशाचा जन्म झाला.

Vijay Diwas 2022

तेव्हापासून भारत दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करतो.

Vijay Diwas 2022
CTC Image