सरकारनामा ब्यूरो
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज ( 25 मार्च ) शेवटचा दिवस आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद आज (25 मार्च ) विधानसभेत उमटले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध दर्शवला.
आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकशाहीची हत्या’ असे हातात फलक घेऊन, मूक आंदोलन करण्यात आले.
ही लोकशाहीची दडपशाही आहे, असं मत मांडत सगळ्याच विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला आहे.