Deepak Kulkarni
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा आज जन्मदिवस आहे.
त्यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील लातूरमधील बाभळगाव या गावी झाला.
देशमुख यांनी 1974 मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत ते 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
त्याच मतदारसंघातून 1985 आणि 1990 मध्ये पुन्हा निवडून आले.
1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले.
आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनीनंतर मागे वळून पाहिले नाही.
पुढे 1995 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
13 ऑक्टोबर 1999 ला विलासराव पहिल्यांदा आणि 2004 च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. 2009 ते 2011 दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे ते मंत्री होते.
यकृत प्रत्यारोपणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि देशमुख यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले.