अनुराधा धावडे
27 जुलै 1953 रोजी रामदास कदम यांचा जन्म झाला. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
कांदिवलीतून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली
कांदिवली गटप्रमुख, शाखाप्रमुख, खेडचे आमदार अशी पदे त्यांना मिळत गेली आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली.
1990 साली ते पहिल्यांदा खेड मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर 1995, 1999, 2004 मध्येही विधानसभेवर निवडून आले
1995 साली शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि गृहराज्यमंत्री होते.
2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कदम यांची विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली.
2009 साली राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी कदमांचा पराभव केला होता. त्यानंतर कदमांना शिवसेनेनं विधानपरिषदेत पाठवलं.
2014 मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रिपद देण्यात आलं. पर्यावरण मंत्री असताना प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय विशेष गाजला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला.
त्यांच्याऐवजी मुलगा योगेश कदम यांना दापोली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.त्यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम यांना पराभूत केले
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.