Deepak Kulkarni
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला.
राजीव गांधी यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा राजकीय वारसाच चालवला नाही तर देशाला तंत्रज्ञान आणि जागतिक उंचीवर नेण्याचे अभूतपूर्व कार्यही केले.
राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधी व्यावसायिक पायलट होते. त्यांनी 1970 मध्ये एअर इंडियामधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
पंतप्रधान म्हणून राजीव गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील शेवटचे सदस्य होते. त्यांच्यानंतर गांधी कुटुंबीय राजकारणात असले तरी पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान होऊ शकले नाही.
इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियांशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला.
इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते.
त्यांची प्रतिमा नेहमीच स्वच्छ आणि निष्कलंक होती. 1980 मध्ये जेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना मिस्टर क्लीन मानले गेले.
बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले
गांधी यांची 21 मे 1991 रोजी आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.
गांधी यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.