Ganesh Thombare
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात 2014 आणि 2019 ला भाजपचं सरकार सत्तेत आलं. आता मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला होता.
1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी (गूड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.
मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 (दि.5 ऑगस्ट 2019) हटवण्याचा निर्णय घेतला.
मोदी सरकारने पहिल्या टर्ममध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक (दि.28 सप्टेंबर 2016) केला होता.
पुलवामामध्ये 2019 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला होता.
मोदी सरकारने तिहेरी तलाकच्या संदर्भातले विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करत मोठा निर्णय घेतला.