सरकारनामा ब्यूरो
आज (30 डिसेंबर) अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
तडफदार नेतृत्व म्हणून अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे.
अजित पवार यांच्या यशामध्ये सुनेत्रा पवार यांचा मोलाचा वाटा आहे.
सुनेत्रावहिनी खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
पवारांचे गाव म्हणून नाव लौकीक असणाऱ्या काठेवाडी गावाचा चेहरा मोहरा सुनेत्रा पवार यांनी बदलला आहे. आज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं.
सुनेत्रा पवार या एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. त्यांनी देशात पर्यावरणपूरक गावाची संकल्पना दिली.
बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.