Deepak Kulkarni
काही दिवसांपासून दोन जमातींमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मणिपुरमध्ये संघर्ष पेटला आहे.
केंद्र सरकारनं तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. तसेच दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.
या हिंसाचारात महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते.
याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संवाद साधला.
राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली होती.
त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूरमधील इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत विशेष विमानाने आणण्यात आले.
सोमवारी रात्री (दि.8 मे) विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
पालकांसह भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची विमानतळावर मोठी गर्दी केली होती.यावेळी आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच पालकांचा अश्रूचा बांध फुटला...
राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.