सरकारनामा ब्यूरो
जगप्रीत कौर या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव आहेत.
सध्या त्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.
कौर यांनी 'यूएन'मध्ये काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चांगलच खडे बोल सुनावले.
परदेशी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्या इंजिनियर होत्या तसेच त्यांनी बँकिंग क्षेत्रातही काम केले आहे.
८ मार्च रोजी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (UN) व्यासपीठावरून कौर यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अवर सचिव जगप्रीत कौर यांनी मानवाधिकारांवर भाष्य करत पाकिस्तानला कडक शब्दात खडे बोल सुनावले.
"पाकिस्तानचे लोक लोकशाहीपासून वंचित आहेत आणि त्यांनी आधी आपले घर व्यवस्थित करावे."
"आधी तुमच्या लोकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे वाईट रेकॉर्ड सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा." अशा शब्दात त्यांनी टीका केली.