Indian National Congress : काँग्रेसचा आज 138 वा स्थापना दिवस, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास

सरकारनामा ब्यूरो

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला ब्रिटीश अधिकारी एलेन ओक्टेवियन ह्यूम, त्यासोबत दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली.

Allan Octavian Hume | Sarkarnama

'दिनशा एडलजी वाच्छा' अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापकस सदस्य आणि अध्यक्ष होते.

Dinshaw Wacha | Sarkarnama

कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील 'व्योमेशचंद्र बॅनर्जी' काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

womesh Chandra Bonnerjee | Sarkarnama

28-31 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले.

Congress Group | Sarkarnama

'अ‍ॅनी बेझंट' या 1917 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.

Annie Besant | Sarkarnama

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र आले होते. या सर्वांनी मिळून काँग्रेसची स्थापना केली होती.

Congress Party Group | Sarkarnama

महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर काँग्रेसशी जोडले गेले. गांधींचा राजकारणात प्रभाव होता त्यामुळे काँग्रेसचे मोठे संघटन निर्माण झाले होते.

Congress Party Group | Sarkarnama

गांधी 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या लोकप्रियतेला आणि सत्याग्रहाला त्या काळातील प्रमुख राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाला.

Mahatma Gandhi | Sarkarnama

नेहरू स्वतः 1951 ते 1954 पर्यंत अध्यक्ष होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान होते.

Pandit Jawaharlal Nehru | Sarkarnama

1959-60 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.  

Indira Gandhi | Sarkarnama

महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली, काँग्रेस हा एक प्रबळ गट बनला ज्याने सर्व जातीय भेद, गरिबी, अस्पृश्यता आणि धार्मिक आणि वांशिक विभागणी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Sarkarnama

इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली.

Rajiv Gandhi, Sonia Gandhi, Rahul Gandhi | Sarkarnama

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे हे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

Mallikarjun Kharge | Sarkarnam

Next : Winter Session : शंभूराज देसाईंवर विरोधकांनी केलेले 'आठ' आरोप कोणते?