Rashmi Mane
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना केली.
मराठी माणसांच्या न्याय व हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची पायाभरणी केली होती.
बाळासाहेबांनी 1968 मध्ये शिवसेनेची 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी करण्यात आली.
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाकडे 'धनुष्यबाण' हे चिन्ह नव्हते.
शिवसेनेने 1971 मध्ये ताडाचे झाड, ढाल, तलवार आणि रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हांवर पहिली निवडणूक लढवली होती.
1985 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला पहिल्यांदा 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह मिळाले.
'धनुष्यबाण' या चिन्हावर 1989 मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे चार खासदार विजयी होऊन संसदेत पोहोचले. त्यामुळे शिवसेनेसाठी धनुष्यबाण हे चिन्ह नेहमीच लकी ठरले.
1989 मध्ये शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना' सुरू केले आणि त्याच वर्षी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कायमचे मिळाले, तेव्हापासून शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवत आहे.