Rashmi Mane
गृहमंत्री अमित शाह सोमवारी (10 एप्रिल) अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
किबिथू या सीमावर्ती गावात त्यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज' उपक्रमाची सुरुवात केली.
"भारताच्या सीमेवर कोणीही अतिक्रमण करण्याचा तो काळ गेला आहे. भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस कोणी करू नये. आता सुईच्या टोकाएवढ्या जमिनीवर अतिक्रमण करता येणार नाही."
1962 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या किबिथूच्या हुतात्म्यांना 'रिमेंबरन्स हट' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.
रिमेंबरन्स हट किबिथू येथे त्यांनी भेट दिली.
अरुणाचल प्रदेशातील इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (ITBP) सीमा चौकीची पाहणी केली आणि सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.
'आयटीबीपी'चे काम कशा पध्दतीने चालते याचा आढावा शाह यांनी घेतला.
जगातील सर्वात खडतर प्रदेशात देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिकांबरोबर संवाद साधला.
अमित शाह सध्या बडाखनामध्ये सैनिकांसोबत कॅम्पमध्ये मुक्काम केला.
अरुणाचल प्रदेशातील किबिथू येथे आयटीबीपी जवानांशी संवाद साधला.