Sunil Balasaheb Dhumal
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही योजनांची यावेळी आढावा घेतला.
बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्यात ४४१ वसतिगृहांच्या माध्यमातून ६१ हजार ५०० विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करून देण्यात येत आहे.
बार्टीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ८६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणार.
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरे देऊन आधार देण्यात येत आहे.
शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात शिधा पोहचवण्यात आला.
बौध्दजन पंचायत समितीच्या इमारतीसाठी २५ कोटी रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले.