सरकारनामा ब्यूरो
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या काष्टी ग्रामपंचायतीत पॅनलने १७ पैकी १० जागावर विजय मिळवला आहे.
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते पराभव केला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने यांना कागल गावातील सत्ता राखण्यात यश मिळाले आहे.
बीड तालुक्यातील नवगण राजूरीच्या संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या पॅनलचा पराभव करत नवगण राजूरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूने कौल दिला आहे.
सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यात 17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर राणे गटाची सत्ता आली आहे.
सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल यांना कौल दिला आहे.
जिल्हातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींपैकी आत्तापर्यंत थोरात गटाने 25 जागांवर आपली सत्ता राखली आहे.