सरकारनामा ब्यूरो
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटामध्ये अखेर युती झाली आहे. दोन्ही पक्ष आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत.
ठाकरे गट आणि वंचित युतीमुळं भाजपचं टेन्शन वाढलं.
वंचितमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर फटका बसल्याची कबुली प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
वंचितचा प्रयोग करून आंबेडकर यांनी राज्यात आपली वेगळी ताकद निर्माण केली आहे.
नव्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वंचितने 2019 ला विधानसभेत उमेदवार दिल्यामुळे अनेक ठिकाणी मतं विभागली गेली. त्याचा फायदा भाजपला झाला होता. तर सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता.
वंचित- ठाकरे गटाच्या युतीनंतर भाजप आणि शिंदे गट आगामी काळात मनसेला सोबत घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
वंचितची लोकसभा निवडणूकीत 'एमआयएम'सोबत युती होती.
वंचितमुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीला 30 हून अधिक जागांचा फायदा होणार असल्याची चर्चा.