अनुराधा धावडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपुर्तीनिमित्त देशातील नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी "हर घर तिरंगा" मोहीम सुरू केली.
15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
हर घर तिरंगा अभियानामागील उद्देश नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि लोकसहभागाच्या भावनेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आहे.
तसेच, 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात ध्वज फडकवणे हादेखील या अभियानामागील एक उद्देश आहे.
केंद्र सरकारने देशभरातील 25 कोटी घरांवर स्वेच्छेने तिरंगा प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 150 हून अधिक देशांमध्ये 50,000 हून अधिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून आझादी का अमृत महोत्सव हा साजरा करण्यात येणार आहे.
भारतभर ध्वजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
देशातील सर्व टपाल कार्यालयांनी 1 ऑगस्ट 2022 पासून ध्वजांची विक्री सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना राष्ट्रध्वज 'तिरंगा' प्रोफाइल पिक्चर म्हणून लावण्याचेही आवाहन केले आहे.