अनुराधा धावडे
मुकुल रोहतगी हे देशाचे नवे अॅटर्नी जनरल (महान्यायवादी) असतील. त्यांचा दुसरा कार्यकाळ १ ऑक्टोबारपासून सुरू होणार आहे.
भारताचे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने महान्यायवादी पदाची नियुक्ती करतात
महान्यायवादी केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी असतो
सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची महान्यायवादी पदावर नेमणूक केली जाते.
केंद्र सरकारला कायदेविषयक बाबींवर सल्ला देणे हे महान्यायवादीचे काम असते.
भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली व कायद्याने त्यांच्याकडे सोपविलेली कामे पार पाडणे हेदेखील त्यांचे कार्य असते.
भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये सुनावणी चा अधिकार महान्यायवादी यांना आहे
महान्यायवादी म्हणून काम करताना संबंधित व्यक्तीला केंद्र सरकारविरुद्ध कोणालाही सल्ला देण्याचा अधिकार नाही.
के.के वेणुगोपाल हे सध्या अॅटर्नी जनरल पदावर कार्यरत असून येत्या ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यकाळ संपत आहे.