अनुराधा धावडे
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला.
डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून 1982 ते 1985 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक बँकिंग सुधारणा केल्या.
मनमोहन सिंग यांनी 1998 ते 2004 या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते.
2004 ते 2014 दरम्यान यूपीएच्या नेतृत्वाखालील अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारचा पराभव करून पंतप्रधानपदाची शपथ घेतली
पंतप्रधान होण्यापूर्वी ते 1991 मध्ये नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीही होते.
मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री होताच देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल केले.
24 जुलै 1991 रोजी अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या, ज्याचा परिणाम म्हणजे आज आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ब्रिटनपेक्षाही पुढे आहोत.
मनमोहन सिंह यांनीच मनरेगा, आरटीआय सारख्या सेवा देशाला दिल्या. या दोन्ही योजनांचा लाभ करोडो लोकांपर्यंत पोहोचला.
भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचचली. त्यामुळे सरकारच्या विविध निर्णयांमुळे जागतिक मंदी असतानाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही.