सरकारनामा ब्यूरो
शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी 1955 साली त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात व्यंगचित्रकार म्हणून केली होती.
बाळासाहेबांनी रेखाटलेली त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी, विलक्षण कल्पनाशक्ती असलेली त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली.
घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता, रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास असायचा.
हिंदूत्ववादी विचारसरणीच्या बाळ ठाकरेंनी चिनी आक्रमणाबद्दल जोरदार टीका केली होती.
एखाद्या पात्राची विशिष्ट वेशभूषा रेखाटावी तर ती बाळासाहेबांनीच!
बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंधांना नेहमीच विरोध केला आहे. या व्यंगचित्रात त्यांनी इंदिरा गांधींना पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्याविरोधात फटकारले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण मुख्यत्वे शरद पवार आणि बाळसाहेब ठाकरे या दोन दिग्गजांच्या भोवती फिरत राहिले आहे.
आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळसाहेब ठाकरे यांनी भ्रष्टाचार आणि गरीबीवर प्रश्न उपस्थित केले.
या व्यंगचित्रात इंदिरा गांधींनी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर लगेचच नऊ राज्यांत काँग्रेसची सत्ता कशी गमावली यावर टीका केली.