सरकारनामा ब्यूरो
135 दिवस, 14 राज्य, 75 जिल्हे; तीन हजार 570 किलोमाटर अंतर पार केल्यानंतर भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप झाला.
7 सप्टेंबर 2022 पासून कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 ला समारोप झाला आहे.
भारत जोडो यात्रेमध्ये बॉलिवूडचे अक्टर्स, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीतले लोकांनी या यात्रेत हजेरी लावाली आहे.
या यात्रेत घेतलेल्या त्यांच्या प्रत्येक सभेतून महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्नावर प्रश्न उपस्थित केले.
या यात्रेदरम्यान भावा- बहिणीच्या नात्यातला आपलेपणा सगळ्या जगाने बघितला.
देशातील जनसामान्यांत एकजूट निर्माण झाली.
यात्रेदरम्यान राहुल गांधींनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
थंडी, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता राहुल यांनी भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पाडली.
भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली. लोकांमध्ये जाणारा नेता अशी त्यांची ओळख झाली. त्यातून निर्माण झालेलं नवचैतन्य टिकवण्याचं आव्हान राहुल यांच्या समोर असणार आहे.