सरकारनामा ब्यूरो
मुंबई महानगरपालिकेत रस्ते घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या विषयी शिंदे सरकारला 10 प्रश्न विचारत, जोरदार हल्लाबोल केला आहे.
1 - मुंबईवर प्रशासक असताना ४०० किमीच्या ६०८० कोटी रु. इतक्या प्रचंड किमतीच्या रस्त्यांची कामं, हा प्रस्ताव कोणी दिला ?
2 - आधीच मुंबईत सुरू असलेल्या कामांमुळे गैरसोय होत असताना पावसाळ्याआधी ही कामं पूर्ण होतील का?
3 - महानगरपालिकेत नगरसेवकांचा कालावधी संपलेला असतांना परस्पर ६०८० कोटी रुपयांच्या निविदा काढणं लोकशाहीत बसत का ?
4 - मुंबईकरांचे मेहनतीचे ६०८० कोटी रुपये तुम्ही कुठल्या बजेटमधून वापरणार ?
5 - रस्त्यांच्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्थांकडून लागणाऱ्या परवानगी आणि NOC मिळाल्या आहेत का? एक काम करताना दुसरी अडचण निर्माण झाली तर जबाबदार कोण?
6 - BMC ने ठरवलेल्या किमतीपेक्षाही अधिक बोली लावणाऱ्या कंत्राटदारांना काम दिलेच कसे ? मागितलेल्या सरासरी ८% वाढीबद्दल 'negotiate' का केल्या नाहीत ?
7 - कंत्राटदारांनी मागितले म्हणून पैसे वाढवले ? खोके सरकार कंत्राटदारांसाठी काम करते की मुंबईकरांच्या हितासाठी ?
8 - शहरात नागरिकांना त्रास न होता, वाहतुकीला अडथळा निर्माण न करता रस्ते बांधणे सोपे नसते...
9 - अंधेरीच्या गोखले पुलासाठी 'VJTI' आणि 'IIT' या संस्थांनी दिलेला अहवाल केराच्या टोपलीत टाकलात, तर आता ह्या कामासंदर्भात त्यांनी सूचना केल्या तर त्या ऐकून तरी घेतल्या जातील का?
10 - ही टोळधाड आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. बरोबर ५ कंत्राटदारांना ५ कामे मिळाली आहेत. ह्या निविदांमधले आकडेच दाखवून देत आहेत की, परस्पर सामंजस्यातूनच हे घडले आहे.