अनुराधा धावडे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनीदेखील बुधवारी (२४ ऑगस्ट) राजीनामा दिला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी हिमाचल प्रदेशमधील वरिष्ठ पदाचा राजीनामा दिला.
दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी 25 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिला होता.
सुनील जाखड यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला
नेतृत्वावरील नाराजीमुळे हार्दिक पटेलनेही काँग्रेस सोडली आहे
अश्विनी कुमार विधानसभा निवडणुकीपूर्वी निघून गेले होते
अश्विनी कुमार यांच्या आधी आर.पी.एन सिंह यांनी जानेवारीत काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
2015 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हेमंत बिस्वा सरमा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.
ऑक्टोबर 2016 मध्ये एन. बिरेन सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आज ते मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत.
त्याचवेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.