परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा चौथ्या दिवशी गुरुवारी श्री क्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग औंढानागनाथ या ठिकाणी पोहचली. तेथे डॉ. अमोल कोल्हे यांनी महादेवाच्या चरणी प्रार्थना केली आणि साकडं घातलं की हे निष्क्रिय सरकार पाय उतार होऊ दे . रयतेच राज्य येऊ देत आणि हे राज्य शिवस्वराज्य होऊ देत .
यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील होते . यांनतर शिवस्वराज्य यात्रा परभणीत दाखल झाली . दुपारी चार वाजता परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ.कोल्हे यांनी युवक-युवतींशी थेट संवाद साधला.त्यावेळी त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.
भाजप सरकारकडून युवकांच्या भावनांचा खेळ मांडला आहे.तरुणांना व्यसनाधिन करुन बिघडविण्याचे काम करणाऱ्यांची महाजनादेश यात्रा काढण्याची हिमंत तरी कशी होते? असा प्रश्न करत सरकारडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी परभणीत केला.
डॉ.कोल्हे पुढे म्हणाले,युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ असून युवकांनी मतदानासारख्या शस्त्राच्या माध्यमातून हा जाब विचारला पाहीजे . व्यवस्था बदलायची असेल तर आधी सरकार बदला .सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता असे सुत्र अवलंबत विदयमान सरकार सुडबुध्दीचे राजकारण करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.