दुष्काळग्रस्तांना मदत करा, विजयाचा सोहळा नको : डाॅ.अमोल कोल्हे

शरद पवार यांचे मार्गदर्शन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील साहेब यांचे अचूक नियोजन तसेच सर्व स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते यांनी अफाट मेहनत घेतल्यामुळे व मायबाप मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळे हा विजय साकार झाला असे डॉ.कोल्हे यांनी नम्रतापूर्वक सांगितले.
दुष्काळग्रस्तांना मदत करा, विजयाचा सोहळा नको : डाॅ.अमोल कोल्हे

पिंपरी : प्रलंबित कामे मार्गी लावणे,दिलेल्या आश्वासनांच्या बाबतीत ठोस पावले उचलणे आणि पथदर्शी प्रकल्प राबविणे असा आपल्या कामाचा थ्री पॉईंट अजेंडा राहणार असल्याचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मंगळवारी 'सरकारनामा'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. दरम्यान, दुष्काळामुळे विजयाचा सत्कार सोहळा न करता दुष्काळग्रस्तांना व त्यातही चारा छावण्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी शिरूरकरांना केले आहे.

तूर्त दुष्काळी कामांना प्राधान्य व दुष्काळग्रस्तांना मदत याला सर्वोच्च प्राधान्य आहे,असे डॉ.खा. कोल्हे यांनी स्पष्ट केले.त्यासाठी पवारसाहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यामुळे काम करणे सोपे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजीराजांवरील मालिका संपेपर्यंत नेता व अभिनेता अशा दोन्हींना न्याय देणार असून त्यासाठी मोठी कसरत होणार असल्याचे त्यांनी कबूल केले. मालिका संपेपर्यंत आठवड्यातील तीन दिवस मतदारसंघात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरु करणार आहे. 10 जून रोजी दिल्लीला जाणार असून शपथविधी व अधिवेशन संपल्यानंतर लगेचच वेगात कामे सुरु करणार आहे, असे ते म्हणाले.

प्रचारार्थ अहोरात्र परिश्रम घेणारे पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि मतदानाचा अधिकार बजावलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी खा.डॉ.कोल्हे यांनी आजपासून (ता.28) आभार दौरा सुरु केला. तो चार दिवस चालणार आहे. थेऊरच्या गणपतीपासून हवेलीचा त्यांचा हा दौरा सकाळी सुरु झाला.15 वर्षानंतर विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो,परंतू, राज्यातील दुष्काळ विचारात घेता या दौऱ्यात सत्कार समारंभ टाळावे, असे आवाहन डॉ.कोल्हे यांनी केले आहे.आपल्या विजयाबद्दल माता,भगिनींचे त्यांनी विशेष आभार मानले.

शरद पवार यांचे मार्गदर्शन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील साहेब यांचे अचूक नियोजन तसेच सर्व स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते यांनी अफाट मेहनत घेतल्यामुळे व मायबाप मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळे हा विजय साकार झाला असे डॉ.कोल्हे यांनी नम्रतापूर्वक सांगितले.

ते म्हणाले, "मतदारसंघात आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या वेळेस अनेक जण जल्लोषात स्वागत व सत्कार करण्याच्या तयारीमध्ये आहेत.फटाके उडवून, गुलाल, भंडारा उधळून, डीजे वाजवून,शाल, बुके देऊन तुम्ही विजय, आनंदोत्सव साजरा व स्वागत करणार आहात. परंतु, मी आपणास सर्वांचा आदर ठेवून आवाहन करतो की आपल्या सर्वांना ज्ञात आहे संपूर्ण राज्यात सध्या दुष्काळाचे संकट आहे.आपला बळीराजा मोठ्या अडचणीमध्ये आहे.त्याचं सर्वात मोठं धन म्हणजे पशुधन हे कसं जगवायचं हा प्रश्न आहे. आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. माझ्या शेतकरीराजाला त्याचा पशुधन जगविण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी माझ्या स्वागत व सत्कारावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त चारा छावण्या यांना मदत करण्याच्या कामास आपण मला मदत करावी ही नम्र विनंती."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com