अमित शहा यांनी शिवसेनेला फटकारले पण परतीचे दोर कापले नाहीत  

आता त्याच्या काही नवीन अटी समोर येत आहेत त्यांबाबत आमचे काही रिझर्वेशन आहेत .पण योग्य वेळी त्यावर विचार करू . -अमित शहा
devendra_uddhav_amit_shaha.
devendra_uddhav_amit_shaha.

दिल्ली: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे मी स्वतः निवडणूक प्रचारा  दरम्यान अनेक जाहीर सभांतून सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेक जाहीर सभातून फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते .  त्यावेळी शिवसेनेने त्याला आक्षेप का घेतला नाही ?  असा सवाल भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्रीअमित शहा यांनी शिवसेना नेत्यांना विचारला आहे. 

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंग याबाबत आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत अमित शहा यांनी अखेर आपले मौन सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री अमित शहा असे म्हणाले ,देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे मी वारंवार सांगितले होते .  शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याबाबतचा कुठलाही विषय झालेला नव्हता.  देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आम्ही आम्ही जेव्हा जाहीर सभांमधून घोषणा करत होतो तेव्हा शिवसेनेने कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही? तो दावा तेंव्हा का खोडून काढला नाही ? 

 श्री . शाह एका प्रश्नाचे उत्तर देताना  म्हणाले , शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड  काय बोलणं झालं हे सांगणे आमच्या पक्षाचा संस्कार नाही .   ते आम्ही योग्य मानत नाही. आम्ही शिवसेने बरोबर सरकार बनवण्यास तयार होतो.  पण शिवसेनेच्या काही गोष्टी आम्हाला मान्य नव्हत्या . युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे मी, आणि मोदीजी बोललो होतो . तेंव्हा  कोणी त्याला आक्षेप घेतला  नाही . आता त्याच्या काही नवीन अटी समोर येत आहेत त्यांबाबत आमचे काही रिझर्वेशन आहेत . पण योग्य वेळी त्यावर विचार करू . 


महाराष्ट्राचे राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून विरोधी पक्ष देशातील जनतेची दिशाभूल करू पाहत आहेत . असा आरोप करून श्री अमित शहा म्हणाले, राज्यपालांनी कोणत्याही घटनात्मक  तरतुदीची पायमल्ली केली नाही . राज्यपालांनी सर्व पक्षांना संधी दिली . प्रत्येकाला वेळ दिली . आमच्यासह कोणालाही सरकार स्थापना करता आली नाही . आणि आजही वेळ गेलेली नाही. त्यांच्याकडे जर बहुमत असेल तर त्यांनी सरकार बनवावे . तुम्ही दोन दिवस मागत होता त्यांनी सहा महिने दिले .    कपिल सिब्बल सारखे ज्येष्ठ  वकील पोरकट आरोप करीत आहेत की आम्हाला सरकार बनवायची संधी दिली नाही . त्यांना कोणी रोखली ? त्यांना अजूनही संधी आहे . त्यांनी सरकार बनवावे . 


राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे खरे नुकसान  भाजपचे  झालेले आहे . राज्यात सध्या भाजपचे देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री होते . त्यांना त्या पदावरून दूर व्हावे लागले आहे . त्यामुळे या विरोधकांच्या काही नुकसान झालेले नाही . राज्यपालांनी त्यांना 18 दिवसाची वेळ दिली होती आतापर्यंत कोणत्याही राज्यात राज्यपालांनी दिली नव्हती , असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com