आंबेडकर जयंती सोहळा पुढे नेण्याबाबत सर्वांनी विचार करावा : शरद पवार

देशाभर 14 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण साजरा करतो. हा सोहळा संपूर्ण महिना दीड महिना आपल्याकडे साजरा केला जातो. या वेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का, याचा विचार करायला हवा. हा सोहळा थोडा पुढे नेणे शक्‍य आहे का, याचा विचार सर्वांनी करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Ambedkar Anniversary Program Can be Postponed Appeals Sharad Pawar
Ambedkar Anniversary Program Can be Postponed Appeals Sharad Pawar

मुंबई : देशाभर 14 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण साजरा करतो. हा सोहळा संपूर्ण महिना दीड महिना आपल्याकडे साजरा केला जातो. या वेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का, याचा विचार करायला हवा. हा सोहळा थोडा पुढे नेणे शक्‍य आहे का, याचा विचार सर्वांनी करावा. कारण समुदायाने विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करताना त्यांच्या योगदानाची आठवण करून सध्याच्या परिस्थितीचा जाणकरांनी विचार करावा," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतानाच प्रशासन व नागरीकांनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात श्री. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले ''कोरोनाशी मुकाबला करताना महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वयंसेवी संस्था, व्यक्ती काम करत आहेत. गरीबांना धान्य देणे, अन्न सुविधा देणे यातून राज्यात मोठा हातभार लावत आहेत. या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती व कार्यकर्ते तसेच मदत करणारे दानशूर घटक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. लवकरात लवकर गरजूंच्या अडचणी दूर करून एकत्रीत न येण्याच्या सूचना पाळून या रोगावर आपण सर्वजण निश्‍चित मात करू. या रोगाचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,"असेही त्यांनी स्पष्ट केले.

''देशात लॉक डाऊन असूनही अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढून रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. दैनंदिन घरात लागणारा भाजीपाला व किराणा घेऊन येण्यासाठी सातत्याने घराबाहेर येण्याची गरज आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. पवार म्हणोल, आपल्याकडे भाजीपाल्याची कमतदारता नाही, ग्रोसरी देण्याची सोय शासनाने केली आहे. आपल्याकडे या वस्तू मिळणारच नाही, अशी भूमिका घेऊन रस्त्यावर येणे योग्य नाही. राज्य सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची भुमिका आपण घेतली पाहिजे. जे लोक अंमलबजावणी करत नाहीत. त्यांची दखल पोलिसांना घ्यावी,'' असेही आवाहन पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com