महायुतीचे अंबादास दानवे यांचा 524 मतांनी विक्रमी विजय

महायुतीचे अंबादास दानवे यांचा 524 मतांनी विक्रमी विजय

औरंगाबाद:  औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे विक्रमी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत.  तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना फक्त 104 मते मिळाली . एकूण झालेल्या 647 पैकी 13 मध्ये अवैध ठरली तर शहनावाज खान या अपक्ष उमेदवाराला आठ मते मिळाली. मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या.

 अंबादास दानवे हे पाचही फेऱ्यांत  आघाडीवर होते. मतदानाचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचा असून शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली.

शिवसेना-भाजप महायुतीकडे 333 तर काँग्रेसकडे 251 मतदार होते याशिवाय एमआयएम अपक्ष मिळून एकूण 657 मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. एकोणीस तारखेला यापैकी 647 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता .

सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडीची मते मोठ्या प्रमाणात वळवल्यामुळे अंबादास दानवे यांचा विक्रमी विजय झाल्याचे बोलले जाते. याशिवाय एमआयएम आणि अपक्ष मतदारांनी देखील अंबादास दानवे यांच्यात बाजूने आपला कौल दिल्यामुळे सुरुवातीला चुरसीची वाटणारी ही लढत एकतर्फी झाली . 

काँग्रेसने संख्याबळ राखता न आल्यामुळे ही निवडणूक मतदाना आधीच सोडल्याची चर्चा होती . अंबादास दानवे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री नेते तसेच भाजपच्या नेत्या व पदाधिकाऱ्यांनी देखील परिश्रम घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com