दिल्लीतील विजयानंतर प्रत्येक राज्यात "आप' हातपाय पसरणार ! 

दिल्लीतील विजयानंतर प्रत्येक राज्यात "आप' हातपाय पसरणार ! 

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा देशभर जाळे विणावे असे वाटू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान प्रत्येक राज्यात संवाद मोहीत आयोजित करण्यात आली आहे. 

दिल्लीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करायचे होते. पण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा बाजी मारत कॉंग्रेस आणि भाजपला जोरदार तडाखा दिला. केजरीवाला हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहे. गेल्या पाच वर्षात आपने राजधानीत जी विकास कामे केली त्यावर दिल्लीकर खूश होते. त्याचाच फायदा आपला झाला. 

केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन चोवीस तासही उलटत नाहीत तोवर या पक्षाचे एक नेते आणि मंत्री गोपाळ राय यांनी ट्विट करून इतर पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राय यांनी म्हटले आहे, की आप आता प्रत्येक राज्यात पोचणार आहे. आम्ही पुढील महिनाभर प्रत्येक राज्यात मोहीम राबविणार आहोत. प्रत्येक राज्यात आपशी लोकांना जोडण्याचा प्रयत्न असून एक कोटीहून अधिक लोक या मोहीमेत सहभागी होतील अशी अपेक्षाही राय यांनी बोलून दाखविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com