नागपूर : ''वंचित आणि एमआयएमच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील युतीबाबत चर्चा झाली. एमआयएमचे प्रमुख खासदार असुवोद्दीन ओवेसी हे या संदर्भात बोलतील. त्यांच्याकडून जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे. जागा वाटपाचा विषय अद्यापही गुलदस्त्यात आहे,'' अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या शुभारंभासाठी शहरात आले असताना आंबेडकर म्हणाले की, एमआयएमशी युती अभेद्य आहे. वंचित आणि एमआयएमच्या नेत्यांची बैठक व चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून यावर जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे. राहिला प्रश्न जागा वाटपाचा, हा विषय गुलदस्त्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे सरकार धर्माच्या नावावर सत्तेत आले. जो घटक राजेशाहीत कधील जुळला नाही, त्यांना लोकशाहीत जोडण्यासाठी आरक्षण दिले. त्यांना डावलण्यासाठी हे लोक आरक्षणाचा विरोध करीत आहेत. 50 टक्के आरक्षण हे जातीच्या आधारावर आहे. मात्र, सरकार हे तत्त्व बाजूला ठेवत आहे. सेव मेरिटच्या भाषा करणाऱ्यांनी सरकारला 'चॉईस एज्युकेशन'चा प्रश्न विचारायला पाहिजे, असे ते म्हणाले. हे सरकार ओबीसी, एस.सी.,एस.टी. यांना शिक्षण, नोकरीत बाहेर ठेवून जुनी व्यवस्था कायम करण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे आता ते किल्ले विकायला निघाले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.