अकोला : भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले असले तरी ते लबाडा घरचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. ढोणे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना २०१४ च्या जाहीरनाम्यातील १२५ आश्वासने खोटी ठरल्याचा दावा केला आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पृष्ठभूमीवर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ७५ संकल्प जाहीर केले आहेत. हे संकल्प म्हणजे खोटेपणाचा कळस असल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्वीच्या आश्वासनांचे काय झाले ते स्पष्ट न करता नवीन ७५ आश्वासने दिल्याने जनतेला ही आश्वासने म्हणजे लबाडाचे आमंत्रण वाटत असल्याचा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेस काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदेश महासचिव मदन भरगड, शहर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मनपाचे विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, महिला आघाडीच्या जिल्ह्या अध्यक्षा साधनाताई गावंडे, नगरसेवक मो. जमीर, राजू चितलांगे, अफरोज लोधी, प्रसिध्दी प्रमुख भुषण टाले पाटील, शेख जावेद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या आश्वासनांचे काय?
खरे की खोटे?
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.