अकोल्याचे महापौर म्हणतात, आमदार बाजोरियांनी विकासासाठी एक नया पैशाचा निधी मिळवून दिला नाही

शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांच्या दर्जावरून आता राजकीय दोषारोप सुरू झाले आहेत. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी रस्त्यातील भ्रष्टाचाराबाबत सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी प्रतिहल्ला करीत, ज्यांनी कधी शहराच्या विकासासाठी महापालिकेला एक नया पैशाचा निधी मिळवून दिला नाही, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला.
अकोल्याचे महापौर म्हणतात, आमदार बाजोरियांनी विकासासाठी एक नया पैशाचा निधी मिळवून दिला नाही

अकोला :  शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांच्या दर्जावरून आता राजकीय दोषारोप सुरू झाले आहेत. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी रस्त्यातील भ्रष्टाचाराबाबत सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी प्रतिहल्ला करीत, ज्यांनी कधी शहराच्या विकासासाठी महापालिकेला एक नया पैशाचा निधी मिळवून दिला नाही, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला.
   
अकोला शहरातील सहा रस्त्यांचे काँक्रिटीकरण निकृष्ट असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक केला होता. त्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांना दबाब वाढविला आहे. काँग्रेस, भारिप, शिवसेनेने अधिकाऱ्यांसोबतच सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. 

विरोधकांच्या या आरोपांचे उत्तर महापौरांनी रविवारी महापालिका स्थायी समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. या पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती विशाल इंगळे आणि माजी नगरसेवक सागर शेगोकार यांची उपस्थिती होती.
   
काय म्हणाले महापौर?  

  • आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
  • आमदार बाजोरिया यांनी सातत्याने विरोधात भूमिका घेतली असून, या नेत्याने कधी रस्त्यांकडे फिरकूनही बघितले नाही.
  • भाजपचे आमदार आणि खासदार यांनी वेळोवेळी रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती.
  • रस्त्याच्या कामात दोषी असलेल्या कोणालाही सोडणार नाही. 
  • अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सोबतच हे काम करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांवर ही कारवाई केली जाईल.
  • मी स्थायी समितीचा सभापती असताना अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी पाठपुरावा करून निधी आणला. मुख्यमंत्र्यांनी आमदार व खासदारांच्या विनंतीला मान देत हा निधी उपलब्ध करून दिला.
  • दर्जेदार काम करून घेण्यासाठी काही रस्ते हे मनपाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ठराव घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले होते.
  • कामाचा दर्जा उच्च राहील अशी तांत्रिक यंत्रणा व क्षमता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे रस्त्याची कामे त्यांच्याकडे देण्यात आली होती.
  • अधिकारी व पदाधिकारी किंवा आमदार-खासदार हे रस्त्याच्या दर्जासंदर्भात तांत्रिक दृष्ट्या सक्षम माहिती घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना दोषी कसे ठरविता येईल.
  • तांत्रिकबाजू सांभाळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निश्‍चितच कारवाई केली जाईल. त्यासाठी सत्ताधारीच पुढाकार घेतील.   

काँग्रेस, भारिपवरही टिका

काँग्रेस आणि भारिपवरही त्यांनी हल्लाबोल केला. त्यांनी केलेल्या सर्व आरोपाचे खंडन केले. ज्यांना काहीही माहिती नाही, कधी रस्त्यांच्या संदर्भात तक्रारी केल्या नाही, तेही आरोप करीत असल्याचे महापौर म्हणाले. 

मी राजीनामा देणार नाही!
रस्त्यातील भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवून आमदार, खासदार आणि महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर महापौरांनी चौकशीची मागणी आणि दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावाच आमदार, खासदार आणि मी करीत आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नसल्याचे महापौर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com