अकोल्यात तोकडे मनुष्यबळ, अपुरी साधने; तरी निर्धाराने लढाई!

संकटाच्या काळात सर्वच मतदतीसाठी बाहेर येतायेत ही बाब चांगली आहे. मात्र त्याचा अतिरेक होताना दिसतो आहे.
akola commissioner sanjay kapadnis interview
akola commissioner sanjay kapadnis interview

अकोला : कोरोना विषाणूचे संकट कोसळले तेव्हा महानगरपालिकेत सर्वच काही आलबेल नव्हते. साधनसामुग्री, आर्थिक परिस्थिती, मनुष्यबळ या सर्वांचीच कमरता होती. उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करून कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. यात बऱ्यापैकी यशस्वी झालो असलो तरी अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्व जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग महानगपालिका क्षेत्रात होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणा आहे त्या परिस्थितीत कामाला लागली. आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेला क्षमता असो किंवा नसो पूर्ण ताकदीनिशी त्याचा सामना करावा लागतो. मनपापुढे अपुरे मनुष्यबळ ही मोठी अडचण आहेच. मात्र त्यामुळे काम थाबंता कामा नये यासाठी सर्वात आधी मनुष्यबळाचे नियोजन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. एकाच वेळी कार्यालयात आणि शहरातही यंत्रणा राबवत आहे. अतिरिक्त जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडील भार कमी करून ज्यांची कामे लॉकडाउनमध्ये थांबली होती, त्यांच्याकडे कामांचे विभाजन केले. स्वतंत्र झोन अधिकारी नियुक्त केले. कार्यालयाची जबाबादारी उपायुक्त वैभव आवारे तर तांत्रिक बाजू डॉ. फारूख यांच्याकडे सोपविली. शासनाकडे पाठवायच्या अहवालाच्या जबाबदारीचे काम उपायुक्त गर्गे यांच्याकडे सोपविले. इतरांनाही जबाबदारी वाटून दिली. आहे त्या सामुग्रीतच काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. वाहन विभाग, आरोग्य यंत्रणा, स्वच्छतेच्या कामात कुठेही कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी शेतकऱ्यांकडील ट्रॅक्टरही मागवून घेतले. त्यामुळे कठीण प्रसंगात अपुरी साधनसामुग्री असतानाही मनपाची यंत्रणा सक्षणपणे उभी राहू शकली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

संकटाच्या काळात सर्वच मतदतीसाठी बाहेर येतायेत ही बाब चांगली आहे. मात्र त्याचा अतिरेक होताना दिसतो आहे. बाहेर पडायचे म्हणून काही जण त्याचा गैरफायदा घेत आहे. ज्यांना कुणाला मदत करावयाची आहे, त्यांनी शासकीय यंत्रणांच्या एका छताखालून आणि मनपाच्या सेलमधून करावी. जेणे करून गरजूंपर्यंत समप्रमाणात खाद्यपदार्थ व अन्नधान्य पोहोचता येईल. काही ठिकाणी सर्वच जण खाद्यपदार्थ पोहचवित आहेत. खाणारे कमी असल्याने अशावेळी अन्न फेकून दिले जात असल्याचे विदारक चित्रही बघावयास मिळत आहे. त्यामुळे एका छताखालून मदतीचे वाटप झाल्यास योग्य व समप्रमाणात वाटप होऊ शकेल, असे आवाहन आयुक्तांनी केले.

  • अपूर्ण मनुष्यबळात आयुक्तांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी छोटे-छोटे व्हॉटस् ग्रुप ग्रूप तयार करण्यात आले. त्यावरून शहरातील घडामोडीचा फिडबॅक मिळतो आणि यंत्रणांना आवश्‍यक सूचना देणेही शक्य झाले.
  • सकाळी ५ वाजतापासूनच नियोजनाला सुरुवात. पहाटे ५.३० वाजता बाजारात व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून लिलाव वेळेत संपविणे आणि गर्दी होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर ६.३० वाजता सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून कामांचे वितरण.
  • डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे जाणवत आहे, पण आहे त्या साधनसामुग्रीचे नियोजन करून आणि प्रसंगी बाहेरून मदत घेवून जुळवाजुळव करीत हा लढा सुरू आहे. बाहेर गावाहून आलेल्यांचा शोध, मकरजमधील उपस्थितांचा शोध घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
  • वारंवार सांगितल्यानंतरही लोकांना कोरोना विषाणू संसर्गाचे गांभिर्य कळत नसल्याचे दिसते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. हे लक्षात घेवून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com