मला नव्हे, अजितदादांनाच राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद मिळणार होते...

राजभवनावर जाऊन महाआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा!
jayant patil about ajit pawar deputy chief minister claim
jayant patil about ajit pawar deputy chief minister claim

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याचा दावा महाविकास आघाडीने करत आपल्याकडे 162 आमदारांचा दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत आदींनी आज राजभवनावर जाऊन 162 आमदारांच्या सह्याचे पत्र सादर करण्यात आले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. सत्तास्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे बळ असल्याने आम्हाला पाचारण करण्याची केली मागणी या करण्यात आली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की रात्री कारभार करून पहाटे शपथ घेतली आहे. जर भाजपकडे संख्या बळ असते तर भरदिवसा शपथ घेतली असती. संख्याबळ नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज झाल्याच्या वृत्ताचा पाटील यांनी इन्कार केला. अजित पवार यांना आमच्या वाट्याला येणारे सर्वोच्च स्थान मिळणार होते, असा दावा त्यांनी केला होता. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी  पुन्हा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे सर्व 54 आमदार सोबत ठेवण्याचा प्रयन्त करणार आहेत. 162 आमदारांना राज्यपालांच्या समोर परेड करण्याची आमची तयारी आहे. राज्यपाल आज नाहीत म्हणून आम्ही आमदारांना आणलं नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com