...मग मंत्र्यांची बॅंक असली तरी गय करणार नाही : अजितदादांचा इशारा

..
ajit_pawar
ajit_pawar

पुणे  : "शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कर्जमाफीची यादी देताना जिल्हा बॅंकांनी पात्र शेतकऱ्यांचीच यादी द्यावी. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींचे नाव आल्यास अथवा चुकीचे काम केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. मग ती मंत्र्यांची अथवा कोणत्याही नेत्यांची बॅंक असो,'' अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दम दिला.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्ज माफी योजनेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी हा दम भरला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले," शेतकऱ्यांबद्दल शासन संवेदनशील आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी कर्जमाफी वैयक्तिक योजनेमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर या योजनेचा आढावा घ्यावा. आपण सर्वजण मिळून चांगले काम करू.''

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "" कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा सहकारी बॅंकानी यादी नीट करावी. कर्जमाफीच्या यादीमध्ये अपात्र व्यक्तींची नावे घुसवू नये. असे प्रकार केल्यास त्या बॅंक अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणतेही गैरप्रकार होता कामा नये. झाला तर खपवून घेतला जाणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com