...आणि आम्हाला आमचे दिवस आठवले : अजित पवारांचा विरोधकांना टोला

काल विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याला अजित पवार यांनी आज उत्तर दिले
Ajit Pawar Taunts Opposition Parties
Ajit Pawar Taunts Opposition Parties

मुंबई : काल विरोधक पायर्‍यांवर आंदोलन करत होते तेव्हा मला आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा.  मग कोणी गोळी द्यायचे तर कोणी काही तरी द्यायचे. पण आमचे सरकार असे काम करेल की त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

काल विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याला अजित पवार यांनी आज उत्तर दिले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माळेगाव साखर कारखाना पाच वर्षापूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आलेत आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो, असे अजित पवार म्हणाले. 

भाजपच्या कालच्या आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "खरं तर भाजपाने आंदोलन करण्याची गरज नव्हती. कालच आम्ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.अर्थसंकल्पही जवळ येतोय. त्यात शेतकर्‍यांना देण्याचा प्रयत्न असेल.  विरोधी पक्षात असलं की जनतेसाठी काही तरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्हीही हे करायचो. माझी विनंती आहे त्यांना जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले तर त्यातून प्रश्न सुटतील,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com