अजित पवार यांनी अखेर धाडस केलचं....

राष्ट्रवादीचा यू टर्न अनेकांना चक्रावणारा
अजित पवार यांनी अखेर धाडस केलचं....

पुणे : भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांनी अखेर धाडस दाखविले. काॅंग्रेस आणि शिवसेनेला चर्चेत अडकवून आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या धाडसाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तीन पक्षांची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.

यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

भाजपने शिवसेनेचा मध्यरात्री गेम केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला संमती दोन्ही काॅंग्रेसने दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकार स्थापन केले. राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. रात्री अचानक घडामोडी घडून भाजप आणि अजित पवार एकत्र आले. देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करणार असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला की अजित पवार हे राष्ट्रवादीतून फुटले, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तऱीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थीर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू.”

अजित पवार म्हणाले, “शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com